शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

दहा टक्के साखर निर्यातीची सक्ती करा-- राजू शेट्टी : उमळवाड येथे शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 00:16 IST

राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे.

उदगाव : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी अखेरीची बिले अद्याप दिली नाहीत. त्यामुळे २७ व २८ जूनला साखर आयुक्तांना घेराव घालण्यासाठी पुण्याला जायचे आहे. उर्वरित बिले काढल्याशिवाय संघटना गप्प बसणार नाही. साखरेला भाव मिळण्यासाठी देशातून ३० लाख टन साखर निर्यात केल्यास भाव आपोआप वाढतील. प्रत्येक साखर कारखान्याला १० टक्के साखर निर्यात करण्याची सक्ती केल्यास शेतकऱ्याला चांगला भाव मिळेल, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.

उमळवाड (ता. शिरोळ) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व ग्रामविकास आघाडी यांच्यावतीने उद्घाटन सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित केला होता. यावेळी खासदार शेट्टी बोलत होते. जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे यांच्या फंडातून उमळवाडच्या विकासासाठी सुमारे ५७ लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शेट्टी म्हणाले, राज्यात २५०० कोटी, तर देशात २० हजार कोटी रुपये साखर कारखानदारांनी थकविले आहे. हे पैसे ३० जूनच्या आत अगोदर द्यावेत अन्यथा आर्थिक कोंडी होईल.उपसरपंच सरिता भवरे यांनी स्वागत, तर सागर चिपरगे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सावकार मादनाईक, शेखर पाटील, राजगोंडा पाटील, सुरेश कांबळे, सचिन शिंदे, नगरसेवक नितीन बागे उपस्थित होते.मृतदेहावरील कापडालाही जीएसटीभाजप सरकारने शेतकºयांच्या वस्तूबरोबरच मृतदेहावरील कापडावरही जीएसटी लावला आहे. त्यामुळे या सरकारला आता खुर्चीवरून खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही असे शेट्टी म्हणाले.भाजपमुळे दर पडलेभाजप सरकार एकीकडे सोयाबीन, हरभरा, तूर, उडीद, मूग खरेदी करतो असे सांगतात. मग ते खरेदी केले जात नाही. भारतात अतिरिक्त साखर असताना पाकिस्तान देशातून साखर खरेदी केली जाते. भाजीपाल्याला काडीमोड भाव या भाजप सरकारमुळेच मिळत असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीkolhapurकोल्हापूर